Breaking News

पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर पोलिसांना आठ तासाची डयुटी देणे शक्य - दीपक केसरकर

औरंगाबाद, दि. 24, सप्टेंबर - पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर पोलिसांना आठ तासाची डयुटी देणे शक्य होईल मुंबईत काही पोलिस ठाण्यात आठ तासाच्या  ड्युटीचा उपक्रम राबवला जात आहे. पण सगळीकडे सध्या ते अवघड आहे असे मत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. मराठवाड्यातील महत्वाच्या  शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी काही रिक्त पदे भरण्याला प्राधान्य देणार असून गुन्हेगारीकडे वळलेल्या बेकार तरूणांना रोजगार उपलबद्ध  कसे करून देता येतील या बाबत विचार होत आहे असेहि ते म्हणाले.पोलिसांच्या माध्यमातून नक्षलग्रस्त भागातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी सोशल इंजिनिअरिंगचा  प्रयत्न सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली कायदा सुव्यवस्थेच्या बैठकीसाठी आज काही काळ औरंगाबादेत होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.