Breaking News

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भारताचे पाकला खडेबोल


नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. कोणीही काश्मीरला भारतापासून विलग करू शकत नाही. तसेच पाकिस्तानच्या पोकळ वल्गना हे सत्य बदलवू शकत नसल्याचे भारताने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत ’राइट टू रिप्लाय’ अंतर्गत भारताने पाकला कठोर शब्दांत सुनावले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार हाय कमिशनरने जम्मू काश्मीर आणि पाकिस्तानच्या ताब्यात मानवाधिकार परिस्थितीबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे नमूद केले होते. या अहवालावर संतप्त स्वरू पाच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. युनोचा अहवाल अतार्किक आणि प्रेरीत असल्याचे भारताने म्हटले होते.