Breaking News

शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत बनतो

शेवगाव शहर प्रतिनिधी - रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स शेवगाव येथे राजर्षी छत्रपती श्री शाहु महाराज यांची १४४ वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. गणपत पोळ यांनी विचार व्यक्त करताना शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत बनतो असे प्रतिपादन केले. जयंती साजरी करण्यामागे आपला काय उद्देश आहे हे स्पष्ट केले. छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळातील दूरदृष्टी व आजच्या सर्वांगीन समाजाचा विकास याविषयी विचार प्रकट केले. अज्ञान दारिद्र्य व अंधश्रद्धा या त्रिसूत्रीवर मात केली . तरच माणूस जीवनात यशस्वी होऊ शकतो प्रा. पोळ म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय अकोलकर यांनी केले. आभार वासिम खान यांनी मानले.