Breaking News

औरंगाबादमध्ये दुसरा मुलगा झाला म्हणून त्याचा खून !

औरंगाबादमध्ये दुसरा मुलगा झाला म्हणून त्याचा खून करण्यात आला आहे. सहसा मुलगी झाली म्हणून तिला रस्त्यावर फेकून देणं किंवा तिला मारून टाकणे या घटना पाहिल्या असतील मात्र दुसरा मुलगा झाला म्हणून त्याला मारून टाकल्याची धक्कादायक औरंगाबादमध्ये घटली आहे.

ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली आहे. दुसराही मुलगाच झाला म्हणून पैठणमधील मातेने आपल्या 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून त्याचा जीव घेण्यात आला आहे. सुरवातीला बाळ गायब झालं म्हणून तक्रार दिली मात्र सकाळी बाळ पिंपात मृतावस्थेत सापडलं. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.