Breaking News

अण्णाद्रमुकच्या १८ अपात्र अामदारांची कोर्टात धाव सर्वाेच्च न्यायालयात २७ जूनला होणार सुनावणी


वृत्तसंस्था। नवी दिल्ली अण्णाद्रमुकच्या अपात्र घाेषित केलेल्या १८ अामदारांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविराेधात मद्रास उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सर्वाेच्च न्यायालयात पाठवण्याची मागणी केली अाहे. सर्वाेच्च न्यायालय या याचिकेवर २७ जून राेजी सुनावणी करणार अाहे. संबंधित अामदारांनी न्यायालयात सांगितले की, १४ जूनला मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे त्यांच्या मतदारसंघांत पुन्हा निवडणूक घेण्यास जास्त उशीर हाेईल. या गंभीर प्रकरणाची सुनावणी लवकर हाेणे गरजेचे अाहे. उच्च न्यायालयाच्या पीठाने दिलेल्या निर्णयावर तिसरे न्यायाधीश पुन्हा सुनावणी करतील.