Breaking News

भीषण अपघातात तीन विद्यार्थी जागीच ठार

बेळगाव : बेळगावहून खानापूरकडे जाणा़र्‍या इंडिका कारची समोरून दुचाकीला धडक बसून बेळगाव-खानापूर रोडवरील प्रभूनगरजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन विद्यार्थी जागीच ठार झाले. अपघातात मृत्युमुखी पडलेले तरुण अनसुरकर गल्ली, मुजावर गल्ली, कोनवाळ गल्ली येथील राहणारे होते. केए 31 एम 6355 क्रमांकाच्या इंडिका कारची एमएच 14 एफएन 6699 क्रमांकाच्या ऍक्टीव्हाला धडक बसल्याने हा भीषण अपघात  घडला. कारच्या धडकेनंतर दुचाकीवरील तिन्ही तरुण उडून पडले. डोक्मयाला जबर मार बसून त्या तिघाजणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तरुणांचे मृतदेह 15 ते 20 फूट अंतरावर पडले होते. अमन आनंद क पिलेश्‍वरी (वय 17, रा. अनसुरकर गल्ली), हर्ष सुनील सांगावकर (वय 17, रा. मुजावर गल्ली), अथर्व अमोल जाधव (वय 16, रा. कोनवाळ गल्ली) अशी त्या दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावे आहेत. ऍक्टीव्हावरून हे तिघेजण भूतनाथ मंदिराला फोटोशूट करण्यासाठी गेले होते. तेथून बेळगावला परतताना हा भीषण अपघात घडला.