Breaking News

मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

मुंबई : काल दिवसभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे कर्नाळाजवळ पूल खचल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आधीच पावसाची रिपरिप आणि त्यात गेल्या तीन तासांपासून झालेली वाहतूक क ोंडी यामुळे मुंबईवरून गोव्याकडे आणि गोव्यावरून मुंबईकडे येणाऱया प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ऐन सकाळी सकाळीच वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईसह राज्यात कालपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आज सकाळी 8 च्या सुमारास कर्नाळाजवळ पूल खचला आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तीन तास झाले तरी वाहतुकीची कोंडी फुटली नसल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.‘