शेतकरी पुन्हा जाणार दहा दिवसांच्या संपावर!
अँड. कमल सावंत यांनी सांगितले, महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी मागील वर्षी याच कालावधीत संपावर गेला होता. त्याची सुरुवात नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून झाली होती. किसान क्रांती संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनाची ठिणगी याच जिल्ह्यात पडली. नंतर ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली.
शांततेच्या मार्गाने व गनिमी काव्याने हा संप करताना कोणताही शेतमाल रस्त्यात न टाकता अहिंसक मार्गाने संप करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे किसान क्रांती संघटनेच्यावतीने सांगण्यात येत आहे.