नैसर्गिक आपत्ती-मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे आठ लाखांची मदत
सोलापूर, दि. 12, मे - नैसर्गिक आपत्तीत मरण आलेल्या दोघांच्या कुटुंबीयांना शासनाकडून प्रत्येकी चार लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. 15 दिवसांपूर्वी सोनंद येथील बाळासाहेब सावंत यांच्या अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला होता.
त्यांच्या परिस्थिती गरिबीच्या असून त्यांच्या मागे पत्नी व लहान मुले आहे. त्यांना घटना घडल्यानंतर 24 तासात नैसर्गिक आपत्तीमधून चार लाखाची तातडीची मदत देणे गरजेचे होते. परंतु सांगोला तहसीलदारांनी कानाडोळा केल्याने भाजप सांगोला तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना कळवले. त्यांनी दखल घेताच सदर कुटुंबाच्या वारस लतिका बाळासाहेब सावंत यांना चार लाखांचा चेक प्रभारी तहसीलदार अनिल इनामदार व सोनंद मंडलाधिकारी डी. एम. कांबळे यांच्या हस्ते व भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत देण्यात आला.