Breaking News

नद्या, तलावांच्या सफाईसाठी सरकारतर्फे १९ प‌थके गठीत


नवी दिल्ली : केंद्र सरकारने पर्यावरण व वन मंत्रालयादरम्यान नद्यांसह त्यांचे किनारे व तलावांच्या स्वच्छतेसाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह शिक्षण संस्थांच्या सदस्यांची १९ पथके गठीत केली अाहेत. ही पथके येत्या पाच जूनपर्यंत निश्चित केलेल्या जागी स्वच्छता अभियान राबवणार अाहेत.
 
याबाबत मंत्रालयाकडून गुरुवारी माहिती देण्यात अाली. त्यानुसार देशातील समुद्र किनारपट‌्टीवरील राज्यांतील सुमारे २४ बीच, १९ राज्यांतील २४ नदीकिनारे तथा काही जलाशयांची यासाठी निवड करण्यात अाली अाहे. सूचीबद्ध नद्या, तलाव व बीच यांच्याशिवाय दिल्लीतील यमुना नदीच्या स्वच्छतेसाठीही विशेष अभियान राबवले जाणार अाहे. या स्वच्छता अभियानासाठी मंत्रालयाने या पथकांत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यांतील पर्यावरण, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन, किनारपट्टीवरील राज्यांच्या मत्स्य महाविद्यालयांसह शिक्षण व संशाेधन संस्थांचा समावेश करण्यात अाला अाहे.