Breaking News

नाशिक जिल्ह्यात 103 गावांना टँकरने पाणीपुरवठा

नाशिक, दि. 3, मे - जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या 132 गाव व वाड्या वस्त्यांची 11 तपासणी पथकांद्वारे पडताळणी करण्यात आली असून त्यानुसार पाण्याची आवश्यकता असलेल्या सात तालुक्यामधील 66 गावे व 37 वाड्या अशा एकूण 103 गावे,वाड्या,वस्त्यांना 36 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.


खरीप हंगामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रस्तावित व मंजूर गावातील पाणी टंचाई बाबत तपासणी पथक समित्या नेमून पडताळणी करणेबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी तहसीलदार, गट विकास अधिकारी यांची व्हिडिओ का ॅन्फरन्स घेऊन याबाबत सूचना दिल्या व पडताळणीसाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी, उप अभियंता लघु पाटबंधारे विभाग, उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा व भूजल सर्वेक्षण आणि विक ास यंत्रणा यांचे एकूण 11 तपासणी पथक तयार करून प्रस्तावित व मंजूर टंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी करून पाहणी अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंजूर 55 गाव व 42 वाड्या असे एकूण 97 तर प्रस्तावित 20 गाव व 15 वाड्या असे एकूण 132 गावे,वाड्या,वस्त्यांची पडताळणी समितीने तपासणी केली.