Breaking News

जलयुक्त शिवार अभियानाची कामे मे अखेरीस पूर्ण करण्याच्या सूचना


नगर । प्रतिनिधी - जलयुक्त शिवार अभियानातील सन 2017-18 मधील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवावा आणि मे महिन्याच्या अखेरीस कामे पूर्ण होतील, असे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात काल (गुरुवार) जलयुक्त शिवार अभियान तसेच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाची आढाव बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी द्विवेदी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उप महावन संरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता थोरात आदी उपस्थित होते.