Breaking News

विजेच्या धक्याने शेतकर्‍याचा मृत्यू

शेतातील पानमळ्याला पाणी देत असताना अचानक विजेचा शॉक लागून प्रगतशील शेतकरी विठ्ठल रामदास मगर यांचा जागीच मृत्यू झाला. सहा महीन्यांपुर्वीच विठ्ठल मगर यांना प्रगतशील शेतकरी म्हणून पुरस्कार मिळाला होता.

तालुक्यातील लेन्हेवाडी येथे प्रगतशील शेतकरी विठ्ठल मगर (वय 44) यांचा अनेक वर्षांपासून पानमळा आहे. ते मंगळवारी गावाजवळील त्यांच्या पानमळ्यातील शेतात पाणी देत होते. यावेळी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पानमळ्यातील लाईटच्या पेटी जवळील केबलला धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उशीरा पानमळ्यातील मुलांच्या लक्षात आली, नंतर त्यांनी गावातील लोकांना घडलेला प्रकार सांगितला. विठ्ठल मगर हे परीसरात प्रगतशील शेतकरी म्हणून परिचीत होते. मागील सहा महीन्यांपुर्वीच त्यांना प्रगतशील शेतकरी म्हणून पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला आकस्मात मुत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो .कॉ. टि. आर पवार हे करीत आहेत.