Breaking News

लाेकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज

केंद्र सरकारच्या धाेरणांमुळे लाेकशाहीचा स्तंभ ढासळणार का, अशी चिंता व्यक्त होत आहे. लाेकशाही वाचवण्यासाठी अाता नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज अाहे. त्यासाठी समविचारी लाेकांनी एकत्र येऊन लाेकशाही अाणखी बळकट करण्याची गरज असल्याचे अावाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले.
अाणीबाणीच्या काळात लाेकशाही पुन:स्थापित करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले हाेते. मात्र, देशात भाजप सरकार अाल्यानंतर अाणीबाणीपेक्षाही भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून लाेकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली जात अाहेत. केंद्रातील लाेकशाहीविराेधी माेदी सरकारला सत्तेवरून खाली खेचून अाणण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या समविचारी लाेकांनी 'फ्रेंड्स डेमाेक्रसी' अर्थात मित्र लाेकशाहीचे या मंचाची स्थापना केली असल्याची घाेषणा गांधी यांनी केली.