भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये स्थानिक निवडणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपवर प्राणघातक हल्ले केले, याचा निषेध करतो. तृणमूलच्या प्रमुख तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हिंसक राजकारण खेळत अाहेत. त्या लोकशाहीला चिरडण्याचे काम करत आहेत, असा आरोप भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी केला आहे. भाजप मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय, पक्षाचे प्रसार माध्यम प्रमुख अनिल बुलनी, मुकुल रॉय, राहुल सिन्हा, रूपा गांगुली, बाबुल सुप्रियो यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत हे आरोप केले.