कृतिशील नेतृत्व हरपले : कोल्हे
कोेपरगांव: समाजवादी विचारवंत आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी वयाच्या नव्वदीपर्यंत लढा देणारे माजी गृहराज्यमंत्री भाई वैदय यांच्या निधनाने कृतिशील नेतृत्व हरपले, अशा शब्दांत माजीमंत्री व संजीवनी उदयोग समुहाचे संस्थापक शंकरराव कोल्हे यांनी श्रध्दांजली वाहिली. संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे आणि आ. स्नेहलता कोल्हे यांनीदेखील भाई वैद्य यांच्या निधनाबददल शोक व्यक्त केला.
बिपीन कोल्हे म्हणाले, ज्येष्ठ नेते भाई वैद्य हे पुलोद सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. त्यांनी अत्यंत साधेपणाने शेवटपर्यंत मंत्रीपदाची कारकिर्द पार पाडली. समाजवादी विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी अव्याहतपणे काम केले. संजीवनी उदयोग समुहाशी त्यांचे अतट नाते होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी संजीवनी उदयोग समुहास भेट दिली होती. त्यांचा सत्कार करण्याचा योग याप्रसंगी आपल्याला आला.
बिपीन कोल्हे म्हणाले, ज्येष्ठ नेते भाई वैद्य हे पुलोद सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. त्यांनी अत्यंत साधेपणाने शेवटपर्यंत मंत्रीपदाची कारकिर्द पार पाडली. समाजवादी विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी अव्याहतपणे काम केले. संजीवनी उदयोग समुहाशी त्यांचे अतट नाते होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी संजीवनी उदयोग समुहास भेट दिली होती. त्यांचा सत्कार करण्याचा योग याप्रसंगी आपल्याला आला.