गौतम बँकेला ४०.१६ लाख नफा
यात म्हटले आहे, माजी खा. कर्मवीर शंकरराव काळेंनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवतांना कारखाना उद्योग समुहाच्या कर्मचा-यांची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी व परीसरातील छोट्या-मोठ्या उद्योजकांना व्यवसायासाठी तातडीने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी गौतम सहकारी बँकेची स्थापना केली. मात्र सरकारच्या चुकीचे धोरणामुळे बँकेला ४ कोटी ७९ लाख रुपयांचा तोटा झाला होता. हा तोटा भरून काढण्याचे आव्हान मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी स्वीकारले. बँकेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या सहकार्याने बँकेचे खर्चात काटकसर, कर्ज वसुलीसाठी वेळप्रसंगी कठोर निर्णय घेण्यात आले.