Breaking News

प्रहार संघटना शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी- आ.बच्चु कडू

कुकाणा प्रतिनिधी /- नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे प्रहार संघटनेच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आला तर राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून त्या सोडविण्यासाठी प्रहार संघटना मोठी शक्ती बनून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी दिली. नेवासा तालुक्यात कुकाणा येथे आयोजित जायकवाडी धरणातील प्रकल्पग्रस्त शेतकरी , शेतमजूर यांच्या मेळाव्यात आमदार बच्चू कडू बोलत होते .