Breaking News

लग्नात वरातीऐवजी केली गावाची स्वच्छता

औरंगाबाद/ मुंबई, दि. 01, मार्च - वांगी बु. येथील नवदाम्पत्याने लग्नात वरात न काढता त्याजागी हाती झाडू घेऊन गावची सफाई करुन नवा आदर्श निर्माण केला आहे. पवन साळवे व रुपाली रावसाहेब साखरे असे या दाम्पत्याचे नाव आहे.

नव दाम्पत्याचा पुढाकार बघून सर्व गावकर्‍यांनीही हातात झाडू घेतला. पवन आणि रुपाली यांचा विवाहसोहळा बोरगाव बाजार येथे अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. हा सोहळा धारेश्‍वर शिक्षण संस्थेचे प्राचार्य व वांगीचे सरपंच महेश पाटील यांच्या घरातील असूनही तो शाही थाटात होण्याऐवजी अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. महेश पाटील यांनी, विवाह झाल्यानंतर सर्वच नवदाम्पत्यांनी आपापल्या गावात अशा प्रकारे स्वच्छता अभियान राबविल्यास प्रत्येक गावात एक आदर्श निर्माण होईल असे सांगितले.