Breaking News

तीन दहशतवाद्यांचा खात्मा


अनंतनाग : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अनंतनाग येथे घडलेल्या चकमकीच्या पार्श्‍वभूमीवर तणावपूर्ण स्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी चकमकीत मारला गेलेला एक दहशतवादी सौरा शहरात राहणारा होता. अनंतनाग जिल्ह्यातील हाकूरा परिसरात ही चकमक उडाली. तीन दहशतवाद्यांपैकी दोघांची ओळख पटली आहे. ईसा फाजली, सईद ओवेस ही चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. अद्यापपर्यंत एका दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा हस्तगत के ला.