उन्हाळा ऋतू सुरू झाल्याची चांगलीच चाहूल जाणवत आहे. उन्हाचा जोर हळूहळू वाढत चालला आहे. सजीवांच्या शरीरातील पाण्याची भासणारी कमतरता आणि उन्हामुळे अंगाची होणारी लाहीलाही लक्षात घेता, कर्जत शहरातील स्त्रियांनी, स्त्रियांसाठी, स्त्रियांमार्फत चालवलेल्या स्त्री चळवळीच्या महिलांनी हिंदवी स्वराज्याची देवता कुलस्वामीनी आई तुळजाभवानी आणि ग्रामदैवत सद्गुरू गोदड महाराज यांना स्मरून उन्हाळ्यात छतावरती पक्षांना भांड्यात पाणी ठेवण्याची शपथ घेतली. या शपथविधीची एक आगळीवेगळी चर्चा सध्या शहरातच नव्हे तर तालुक्यात सुरू आहे. समाजकार्याचे अनोखे कार्यक्रम घेऊन समाजकार्याचा विडाच उचलून स्त्री फौंडेशनच्या समन्वयक मनिषा सोनमाळी आणि त्यांच्या सहकार्यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. कर्जत शहरातून त्यांचे कौतुक होत आहे.
महिलांनी पक्षांसाठी पाणी ठेवण्याची घेतली शपथ
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:53
Rating: 5