Breaking News

दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकाला यश

श्रीनगर : बुडगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांना निष्प्रभ केले. अरिझल येथे झालेल्या चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षारक्षकांना यश मिळाले. शुक्रवारी रात्री देखील चकमकीची घटना घडली होती. अनंतनाग जिल्ह्याच्या डूरू परिसरात उडालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. भारतीय लष्कर, अनंतनाग पोलीस, आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.