माध्यमांनी सामाजिक बांधिलकी जपावी - विजयकुमार देशमुख
सोलापूर, दि. 12, मार्च - समाजामध्ये जागृतीचे काम करत असताना माध्यमांनी सामाजिक बांधिलकीही जपली पाहिजे हे समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याचे माध्यम आहे, असे मत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले. रेडिओ स्वराजच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा सन्मानपत्र व रोपटे देऊन गौरव करण्यात आला.
पालकमंत्री म्हणाले, प्रथमेश बनसोडे या युवकाने रेडिओच्या माध्यमाने जगाच्या कानाकोपर्यातील लोकांची एका अॅपद्वारे संवाद साधण्याचा वेगळा विचार केला. नवे पाऊल पुढे टाकताना त्यांनी सामाजिक बांधिलकीही उत्तम जपली आहे. आजचा महिलांचा सत्कार हे सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण आहे असेही ते म्हणाले.
पालकमंत्री म्हणाले, प्रथमेश बनसोडे या युवकाने रेडिओच्या माध्यमाने जगाच्या कानाकोपर्यातील लोकांची एका अॅपद्वारे संवाद साधण्याचा वेगळा विचार केला. नवे पाऊल पुढे टाकताना त्यांनी सामाजिक बांधिलकीही उत्तम जपली आहे. आजचा महिलांचा सत्कार हे सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण आहे असेही ते म्हणाले.