Breaking News

गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक बंदी ! उल्लघंन करणार्‍यांना तीन महिन्यांचा कारावस, तर 25 हजार रूपयांचा दंड

मुंबई : गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आल्याची घोषणा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी विधानसभेत केली असून, याचे उल्लंघन क रणार्‍या उत्पादक, विक्रेते आणि वापर करणार्‍यांना तीन महिन्याचा कारावास आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. दुधाच्या पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्यांवर तत्काळ बंदी घालणे शक्य नसल्याने त्याची पुनर्निर्मिती केली जाणार आहे. यासाठी ग्राहकांनी दुधाची पिशवी परत केल्यास 50 पैसे तर पाण्याची बाटली परत केल्यास 1 रुपया परत दिला जाणार आहे. या निर्णयाबद्दल युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे अभिनंदन केले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी विधिमंडळात याचे निवेदन केले. पावसाळ्यात मुंबईसह अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी नदी, नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक आढळले होते. प्लॅस्टिकला पर्याय आहे अशा प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली असून, दुधाच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या यांना योग्य पर्याय उपलब्ध न झाल्याने सध्या त्यावर बंदी घालण्यात आलेली नाही. यासाठी पर्याय उपलब्ध क रण्याचे निर्देश उत्पादक कंपन्यांना देण्यात आले आहेत. प्लॅस्टिक बंदीचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यात येणार असून, यासाठी दर तीन महिन्यांनी प्लॅस्टिक उत्पादक संघटनांची बैठक घेतली जाणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 
प्लॅस्टिकचा पुनर्निर्माण होत नाही अशा सर्व प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. औषधांच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक, वन व फलोत्पादनासाठी, कृषी, घनकचरा हाताळण्यासाठी लागणारे प्लॅस्टिक, रोपवाटिकांमध्ये वापरण्यात येणार्‍या प्लॅस्टिक पिशव्या वा प्लॅस्टिक शिटस् यातून वगळल्या आहेत. दुधाच्या पिशव्या ज्या 50 मायक्रा ॅनपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्या किंवा बाटल्या परत देण्यासाठी केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. या पिशव्या परत केल्यास 50 पैसे तर बाटल्या परत केल्यास 1 रुपया मिळणार आहे.