बालमटाकळीसह परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करू ः प्रा. बेरड
बालमटाकळी :- ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या मागे भा.ज.पा. खंबीरपणे उभा राहून गावच्या विकासासाठी विविध मार्गाने निधी उपलब्ध करुण पर्यायाने गावचा विकास करू असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी व्यक्त केले. बालमटाकळी येथील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचयतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपाच्या ग्रामपंचायत सदस्यांचा आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
देशासह राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असून, त्यात भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीतही बाजी मारून ग्रामपंचायत ताब्यात घेतल्या आहेत. ग्रामपंचायतीनेही विविध पद्धतीने विकास कामे केल्यामुळेच भाजपला साथ देऊन ग्रामपंचायत ताब्यात दिल्या असल्याचे ते यावेळी म्हणाले. शेवगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाची खरी मुहूर्तमेड स्व. शिवनाथ वैद्य यांनी रोऊन पक्षाची भरभराट केली, आता तुषार वैद्य यांच्या माध्यमातून आणि पंकजा मुंडेंच्या स्थानिक विकास निधीतून गावचा विकास साधन्याचे काम हाती घेऊन, गावचा विकास करणार्यांमागे आम्ही पक्षाची ताकत पणाला लाऊन जनतेचे प्रश्न सोडविणार असल्याचे गावचे उपसरपंच तुषार भाऊ वैद्य यावेळी म्हणाले.
देशासह राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असून, त्यात भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीतही बाजी मारून ग्रामपंचायत ताब्यात घेतल्या आहेत. ग्रामपंचायतीनेही विविध पद्धतीने विकास कामे केल्यामुळेच भाजपला साथ देऊन ग्रामपंचायत ताब्यात दिल्या असल्याचे ते यावेळी म्हणाले. शेवगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाची खरी मुहूर्तमेड स्व. शिवनाथ वैद्य यांनी रोऊन पक्षाची भरभराट केली, आता तुषार वैद्य यांच्या माध्यमातून आणि पंकजा मुंडेंच्या स्थानिक विकास निधीतून गावचा विकास साधन्याचे काम हाती घेऊन, गावचा विकास करणार्यांमागे आम्ही पक्षाची ताकत पणाला लाऊन जनतेचे प्रश्न सोडविणार असल्याचे गावचे उपसरपंच तुषार भाऊ वैद्य यावेळी म्हणाले.