पहिला अर्थसंकल्प होता केवळ १७१ कोटींचा !
देशाचा पहिला अर्थसंकल्प केवळ सात महिन्यांसाठी सादर करण्यात आला होता. तत्कालीन अर्थमंत्री आर. के. शनमुगम शेट्टी यांनी २६ नोव्हेंबर १९४७ रोजी साडेसात महिन्यांसाठी अर्थसंकल्प सादर केला होता. केवळ १७१ कोटींचा हा अर्थसंकल्प १५ ऑगस्ट १९४७ ते ३१ मार्च १९४८ या साडेसात महिन्यांसाठी सादर करण्यात आला होता.
या अर्थसंकल्पात १७१.८५ कोटी रुपये महसूल जमवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. तसेच महसुली तूट २४.५९ कोटी रुपये ठरविण्यात आली होती. तेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे चलन एकच होते. सप्टेंबर १९४८ पर्यंत भारत व पाकिस्तानचे चलन एकच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.