Breaking News

व्यवसाय करण्याला कोणत्याही जातीधर्माचे बंधन नाही: बाळासाहेब साळुंके


मिरजगाव /प्रतिनिधी /- स्पर्धेच्या युगात तरुणांनी नौकरीच्या मागे न धावता ज्याला जो व्यवसाय करता येईल तो व्यवसाय प्रामाणिक, जिद्द व चिकाटीने करावा. व्यवसाय करण्याला कोणत्याही जाती धर्माचे बंधन राहिलेले नाही. त्यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. असे वक्तव्य कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी केले.

कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथे शिवशक्ती उद्योग फार्मस प्रोड्युसर कंपनीच्या उद्घाटन प्रसंगी बाळासाहेब साळुंखे बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन तहशीलदार किरण सावंत यांच्या हस्ते करण्यात आलेे. यावेळी जिल्हापरिषद सदस्य गुलाब तनपुरे, तहशीलदार नामदेव तळेकर, सुधीर पाटील, महाराष्ट्र राज्य मेट्रोचे प्रमुख मृत्युंजय कुमारसिंह, संपतराव बावडकर, विष्णुपंत टकले, डॉ. रामदास टकले, उद्धवराव नेवसे, सागर जवणे, जयदीप सूर्यवंशी, विनीत टकले, आदि मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष सूर्यवंशी यांनी केले.