Breaking News

आयकर विभागाकडून 26 हजार 500 कोटींची कर वसुली केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची संसदेत माहिती

नवी दिल्ली : उत्पन्नाचे स्त्रोत दडवून ठेवत आयकर न भरणार्‍याविरोधात आयकर विभागाने कडक पावले उचलल्यानंतर तब्बल 26 हजार 500 कोटी रूपयांची वसूली झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी संसदेत दिली. मोठ्या रकमेचे व्यवहार करुनही, वर्षानुवर्ष आयकर न भरणार्‍यांना शोधून काढण्यासाठी सरकारने टीडीएस आणि टीसीएसची मदत घेतली होती. यापुढे अशा पद्धतीने कर भरणे टाळणार्‍यांना सूट मिळू नये, यासाठी 2 लाखांवरील व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्यात आल्याचे जेटली यांनी यावेळी सांगितले. 


दरम्यान, नोटाबंदीनंतर मोठ्या रकमेचे व्यवहार करणार्‍यांवर सरकारची करडी नजर ठेवली होती. अशा जवळपास कोटी 7 लाख लोकांना आयकर विभागाने नजर ठेवून त्यांच्याकडून 26 हजार कोटी वसूल केले आहेत. दुसरीकडे पुढील आर्थिक वर्षात महसुलीतूट ही समाधानकारक राहण्याची अपेक्षा अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केली. शिवाय, कच्चा तेलाच्या वाढत्या किमतीवर बोलतानाही याबाबतच्या सर्व शक्यता त्यांनी फेटाळून लावल्या. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अरुण जेटलींची रिझर्व बँकेच्या अधिकार्‍यांसोबतच्या बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. सध्या तेलबाजारातील कच्चा तेलाच्या किमतीवरुन जे तर्क-वितर्क लढवले जात आहेत, त्यांचे आकलन करण्याची गरज नाही. कारण, गेल्या तीन दिवसात कच्च्या तेलाचे दर पाहिले, तर त्याच्या विरुद्ध स्थिती आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर, त्यात झपाट्याने घसरण होत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.