मुंबई, दि. 01, फेब्रुवारी - भिवंडी येथे सरदार कंपाऊंडमधील भंगार गोदामांना पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 15 ते 16 गोदामे जळून खाक झाली. आगीबाबत माहिती मिळताच उल्हासनगर, कल्याण आणि भिवंडी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आग विझवण्याचे काम हाती घेण्यात आले. याच भागात प्लास्टिकची गोदामे असल्याने आग आणखी वाढण्याची शक्यता आहे.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीत काही घरेही जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 15 ते 20 जणांना आगीतून वाचवण्यात यश आले आहे.
भिवंडीमध्ये भंगार गोदामांना आग; 15 ते 16 गोदामे जळून खाक
Reviewed by Dainik Lokmanthan
on
21:57
Rating: 5