Breaking News

कृषी उत्पादनांवरील कररचनेत कृषीक्षेत्राचा सहभाग घेण्याची नीती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद यांची शिफारस


कृषी उत्पादनांवर कर लावणे किंवा कमी करण्याचे काम हे केवळ ग्राहक किंवा शेतकरी या एकाच घटकाला लक्षात घेऊन करता कामा नये ही नीती आयोगाची भूमिका आहे. कृषी क्षेत्राला या प्रकियेत सहभागी करुन घेतलेच पाहिजे असे आयोगाचे मत असून केंद्र शासनाकडे याबाबत केलेल्या शिफारसीप्रमाणे अंमलबजावणीदेखील होत आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद यांनी आज येथे दिली.
प्रा. चंद यांनी मंत्रालय पत्रकार कक्षामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार गिरीष व्यास उपस्थित होते.प्रा. चंद पुढे म्हणाले की, शेतकरी तसेच ग्राहक या दोन्ही घटकांचे हित लक्षात घेत नीती आयोगाने केंद्र शासनाने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येते. गेल्या काही काळात कृषी उत्पादनांच्या आयात-निर्यातीवर कर वाढवणे किंवा कमी करण्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चांगला बाजारभाव मिळण्यात मदत झाली आहे.