शिक्षकांच्या अभियोग्यता चाचणीत एक लाख ७१ हजार उमेदवारांचा सहभाग
गेल्या तीन वर्षात राज्य शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे शैक्षणिक क्षेत्रात अंतर्बाह्य परिवर्तन घडत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महाराष्ट्र शैक्षणिक प्रगत अभियान, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा आणि शाळांचे डिजिटायजेशन यासारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचाच महत्त्वाचा टप्पा म्हणून गुणवत्तापूर्ण शिक्षकांचा शिक्षण व्यवस्थेत समावेश व्हावा आणि शिक्षक भरतीतील गैरप्रकारांना चाप लागावा यासाठी शासनाने अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. या चाचणीला राज्यातील उमेदवारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
