Breaking News

बोट दुर्घटनेची शनिवारपासून सुरु असलेली शोधमोहीम थांबवली


पालघर, - डहाणूमधील बोट दुर्घटनेतील शनिवारपासून सुरु असलेली शोधमोहीम जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरुन थांबवण्यात आली आहे. ही शोधमोहीम सक ाळी 11. 30 च्या सुमारास सुरु करण्यात आली असून ती 24 तास सुरू होती. घटना घडली त्याठिकाणी चारही बाजूने 10 नॉटिकलपर्यंतच्या परिसरात शोधमोहिम राबवण्यात आली होती. यामध्ये दोन बोटी आणि तीन हेलिकॉप्टर तसेच स्थानिक मच्छीमार बोटींचा समावेश होता.
डहाणूमध्ये शनिवारी 40 विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटून अपघात झाला होता. यातील 35 विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळाले होते. बाहेर क ाढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना रुग्णाालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थी बोटीवर सेल्फी घेण्याच्या मोहापायी बोटीच्या एका बाजूला सरकले आणि ही दुर्घटना घडली असल्याचे डहाणूची राणी बोटीचे खलाशी महेंद्र यांनी सांगितले.