संगमनेर/प्रतिनिधी। संगमनेर तालुक्यातील कौठे धांदरफळ येथील घराजवळच असलेल्या प्रवरा नदीपात्राच्या शिवारात राहणाऱ्या एकनाथ क्षीरसागर यांचा दोन वर्षांचा मुलगा समर्थ एकनाथ क्षीरसागर वय २ हा काल दि. ११ रोजी सायंकाळी साडे चारच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्याचे कळले, वारंवार शोध घेऊन सुद्धा सापडत नसल्याने शाम रंगनाथ काठे (नातेवाईक) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फोनवरून बेपत्ता मुलाची माहिती दिली. आज सकाळी चिमुकल्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आल्यावर एकच खळबळ उडाली. याप्रकरणातील तपास अधिकारी पो. ना. अनिल जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी तालुका पोलिसांनी घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दोन वर्षांच्या चिमुरड्याचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:15
Rating: 5