कात्रज बोगद्यावजळ चारचाकी-ट्रक अपघात; चौघांचा मृत्यू
पुणे, दि. 12, डिसेंबर - मुंबई-बंगळुरु महामार्गावर कात्रज येथील नवीन बोगड्याजवळ चारचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यु झाला. मुलीला महाविद्यालयात सोडून परत गावी जाणार्या मुंबईतील माने कुटुंबावर काळाने घाला घातला. जांभूळवाडीजवळील दरीपुलाशेजारी आज (सोमवार) पहाटे हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.यशवंत पांडुरंग माने (56), पत्नी शारदा माने (47), मुलगा ऋषीकेश माने (20) आणि चालक रामचंद्र सुर्वे (70) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
माने कुटुंबीय मुळचे मुंबईचे आहे. त्यांची मुलगी शिक्षणासाठी पुण्यात आहे. तिला महाविद्यालयात सोडण्यासाठी माने कुटुंबीय रविवारी आले होते. तिला सोडून ते पहाटे परत निघाले असताना भरधाव ट्रक आणि त्यांच्या चारचाकीची जोरदार धडक झाली. त्यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
सूत्रांनुसार, रामचंद्र सुर्वे हे ड्रायव्हर गाडी चालवत होते. त्यामुळे यशवंत माने यांचा मुलगा ऋषिकेश याने रामचंद्र यांना आराम मिळावा यासाठी थोडावेळ गाडी चालवायचे ठरवले आणि कात्रजच्या घाटात ऋषिकेशचा कारवरचा ताबा सुटला आणि चारचाकी ट्रकला जाऊन धडकली. या भीषण अपघातात माने कुटुंबियांच्या गाडीचे
माने कुटुंबीय मुळचे मुंबईचे आहे. त्यांची मुलगी शिक्षणासाठी पुण्यात आहे. तिला महाविद्यालयात सोडण्यासाठी माने कुटुंबीय रविवारी आले होते. तिला सोडून ते पहाटे परत निघाले असताना भरधाव ट्रक आणि त्यांच्या चारचाकीची जोरदार धडक झाली. त्यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
सूत्रांनुसार, रामचंद्र सुर्वे हे ड्रायव्हर गाडी चालवत होते. त्यामुळे यशवंत माने यांचा मुलगा ऋषिकेश याने रामचंद्र यांना आराम मिळावा यासाठी थोडावेळ गाडी चालवायचे ठरवले आणि कात्रजच्या घाटात ऋषिकेशचा कारवरचा ताबा सुटला आणि चारचाकी ट्रकला जाऊन धडकली. या भीषण अपघातात माने कुटुंबियांच्या गाडीचे