तरुणांनी गीतेचे ज्ञान आत्मसात करावे : ह भ प ठाकरे महाराज
ते म्हणाले की, ज्याच्या त्याच्या कर्मावर पुढच्या जन्माची गती अवलंबून असते. आज जे कर्म आपण करतो. त्याचे संचित होते. तेच पुढील जन्मात दिसून येते. म्हणून चांगले कर्म केले तर चांगलेच फळ मिळते. साधू संतानाही कर्माचे भोग चुकले नाही. तर मनुष्यमात्रांचे काय? फळाची अपेक्षा न धरता कर्म करीत जावे, असे गीतेत सांगितले आहे.
श्रीमदभग्वद्गीता हा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. आपला समाज आपल्याच अमूल्य तत्वज्ञानाकडे सोईस्कर दुर्लक्ष करतो. हे समाजाचे पर्यायाने देशाचे दुर्दैव आहे. गीताजयंतीनिमित्ताने भारतीयांनी गीताभ्यास सुरु केला तर गीताजयंती आपोआपच साजरी होईल. यावेळी गणेशशास्त्री महराज, ह. भ .प. बाळकृष्ण सुरासे, पावडे महाराज, प्रकाश गायकवाड, लकारे महाराज, नकुल जाधव, भाऊसाहेब सिनगर, नानासाहेब सिनगर, प्रा. ठोंबरे आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.