मिहान प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण
उद्योग सुरू करण्यासाठी मुदतवाढ मागितलेल्या कंपन्यांना काम विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या अटीवर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाने एप्रिल 2016 पासून पुढे चारवर्षाची मुदतवाढ दिली आहे. ग्रामीण भागातील तेल्हारा, दहेगाव, कलकुही व खापरी (रेल्वे) येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खापरी (रेल्वे) गावाजवळ करण्यात आले असून पुनर्वसन अभिन्यासातील कामे पूर्ण झाली आहेत.
शहरी भागातील शिवणगाव, जयताळा, भागरी व चिंचभूवन येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन चिंचभुवन येथील नवीन पुनर्वसित गावठाणाजवळ करण्यात येत असून 1 हजार 99 पात्र प्रकल्पग्रस्तांपैकी 1 हजार 23 प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप करण्यात आले आहेत. चिंचभूवन येथील नवीन पुनर्वसित गावठाणातील रस्ते, भूमिगत गटारे, पाणीपुरवठा योजना आदी कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. मिहानमुळे बाधित झालेल्या प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला घर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.