Breaking News

काश्मीरमध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर/वृत्तसंस्था : श्रीनगरमध्ये फुटीरतावादी गटामुळे दहशतवादी हल्लयाच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असून, गुरूवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला, यात चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या लष्कराला यश आले. तर दुसरीकडे सोपोर येथेही भारतीय जवान व दहशतवाद्यांच्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. अजूनही शोध मोहीम सुरूच असल्याचे सांगण्यात येते. गुरूवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि गावात लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. दरम्यान, या वर्षी भारतीय सुरक्षा दलांनी सुमारे 200 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी गावात लपून बसल्याची माहितीसुरक्षा दलाला मिळाली होती. सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरूवात केली. भारतीय जवानांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले.दोन्ही बाजूंनी अनेक तास गोळीबार सुरू होता. यात दहशतवाद्यांचा खात्मा झाला.दरम्यान,सोपोर येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून तिथे एक जवान जखमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर खोर्‍यात पुन्हा एकदा दहशतवादी सक्रीय झाले असून त्यांनी सुरक्षा दलाला लक्ष्य केले आहे. याच महिन्यात 21 नोव्हेंबर रोजी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील गुज्जर पट्टी भागाततील जंगलात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये निमलष्करी दलाच्या एका जवानाला वीरमरण आले होते.