रविदास समता परिषद पदाधिकार्यांची निवड जाहीर
औरंगाबाद, दि. 18, ऑक्टोबर - अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषद या अराजकीय परिवर्तनवादी सामाजिक संघटनेच्या औरंगाबाद जिल्ह्यातील विविध पदाधिकार्यांची निवड समता परिषदेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केली. पदाधिकारी असे : युवा राज्य संघटक - विनोद पुरभे, महिला आघाडी प्रमुख - प्रा. नंदाताई बरथरे, युवा जिल्हाध्यक्ष - प्रवीण बोर्डे, युवा शहराध्यक्ष - रवींद्र बेदवे, युवा शहर उपाध्यक्ष - जगदीश सुरभैय्ये, जिल्हा सचिव - रमेश सुरभैय्ये, जिल्हा संघटक - रोहिदास भगुरे, शहर संघटक - संजय गांगवे, शहर कार्याध्यक्ष - शांतीलाल पिंपळे, शहर सचिव - रवी भगुरे, सिल्लोड तालुकाध्यक्ष - संतोष गायकवाड, कर्मचारी समता परिषद अध्यक्ष - भीमराव वाघमारे. 22 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे समता परिषदेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असून त्या वेळी उर्वरित पदाधिकारी निवडण्यात येणार आहेत. यावेळी समाधान चिंचोले, ह रिदास पुसे, संजय चिक्से, हिरालाल काठोटे, दिनेश पाटेकर, अंजना तुरोरीकर, के. एम. बोराडे, भारत खिरे, नीतिन लसगरे, शिवाजी भगुरे, महेश गायकवाड, उद्भव काटे, खुशालराव भवरे, विजय गवळी, बबलू कांबळे, देविदास फुलमाळी, अशोक जाधव, अरुण तुरोरीकर, पायल पिंपळे, चंद्रकांत खिरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. माणिक गिरगावक र यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.