पाच वर्षात महाराष्ट्रात 400 महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू
मुंबई, दि. 27, ऑक्टोबर - महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये गेल्या पाच वर्षात सुमारे 400 महिलांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑगस्ट 2017 पर्यंत तब्बल 23 महिलांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांमुळे होत आहेत. मोठ्या रूग्णालयांमध्ये असलेल्या शहरांमध्ये महिलेच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
2010 -2011 मध्ये 37, 2011-12 मध्ये 43, 2012-13 मध्ये 64, 2013 - 14 मध्ये 53, 2014 - 15 मध्ये 66, 2015 -16 मध्ये 53 आणि 2016 - 17 मध्ये एकूण 49 महिलांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
2010 -2011 मध्ये 37, 2011-12 मध्ये 43, 2012-13 मध्ये 64, 2013 - 14 मध्ये 53, 2014 - 15 मध्ये 66, 2015 -16 मध्ये 53 आणि 2016 - 17 मध्ये एकूण 49 महिलांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.