30 ऑक्टोबरपासून औरंगाबादचा सिताफळ महोत्सव
औरंगाबाद, दि. 26, ऑक्टोबर - सिताफळ महोत्सव 30 ते 31 ऑक्टोबर दरम्यान होईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आज येथे दिली. विभागीय आयुक्तालय, पर्यटन विकास महामंडळ आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात येत आहे.
पूर्वी हा महोत्सव 13 ते 15 ऑक्टोबरदरम्यान होणार होता. याआधी समन्वयाचा अभाव आणि दिवाळीमुळे सिताफळ महोत्सव पुढे ढकलण्यात आला होता. मराठवाड्याचा विचार क रता 2 हजार 544 हेक्टरवर अनुदानातून सीताफळाची लागवड करण्यात आली आहे. यासह जंगली तसेच इतर डोंगरमाळावर 20 हजार हेक्टरवर सीताफळाची झाडे आहे. कृषी विभागाच्या अनुमानानुसार या माध्यमातून एकरी 60 हजाराचे उत्पन्न शेतक-यास मिळत असून 40 कोटींची उलाढाल होते.
पूर्वी हा महोत्सव 13 ते 15 ऑक्टोबरदरम्यान होणार होता. याआधी समन्वयाचा अभाव आणि दिवाळीमुळे सिताफळ महोत्सव पुढे ढकलण्यात आला होता. मराठवाड्याचा विचार क रता 2 हजार 544 हेक्टरवर अनुदानातून सीताफळाची लागवड करण्यात आली आहे. यासह जंगली तसेच इतर डोंगरमाळावर 20 हजार हेक्टरवर सीताफळाची झाडे आहे. कृषी विभागाच्या अनुमानानुसार या माध्यमातून एकरी 60 हजाराचे उत्पन्न शेतक-यास मिळत असून 40 कोटींची उलाढाल होते.