Breaking News

बैलगाडी शर्यत बचाव समितीने आंदोलन मागे घेतले; 24 ला मंत्रालयात बैठक

सातारा, दि. 18, ऑक्टोबर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होऊन येत्या 24 तारखेला मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्‍वासन मिळाल्याने बैलगाडी शर्यत बचाव समितीने  आज मंगळवारी आंदोलन मागे घेतले.बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी. केंद्र आणि राज्य सरकारने बैलगाडी शर्यती पुन्हा सुरु करण्यासाठी न्यायालयात पाठपुरावा करावा, या  मागणी सोमवारी राज्यातील बैलगाडी चालक-मालक संघटनांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. जिल्हाधिकारी प्रवेशद्वारासमोरच सुमारे  एक हजार बैल दावणीला बांधण्यात आली होती.आंदोलनाच्या निमित्ताने साता्यात तळ ठोकून असलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सकाळी आंदोलनस्थळी आंदोलक ांशी चर्चा केली. त्यानंतर पशुसंवर्धन आयुक्त , जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल , पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी बैलगाडी चालक-मालकांना विनंती के ली.सदाभाऊ खोत यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून आंदोलकांच्या व्यथा मांडल्या. यावेळी येत्या 24 ऑक्टोबरला यासंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे  आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.