महाराष्ट्राचे तुकडे झाले केंद्रात वजन राहणार नाही - कमलकिशोर कदम
नांदेड, दि. 22, सप्टेंबर - महाराष्ट्राचे तुकडे करण्याबाबत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते कमलकिशोर कदम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वतंत्र मराठवाडयाच्या मागणी बददल प्रतिक्रीया देताना ते म्हणाले की महाराष्ट्राचे तुकडे झाले तर एकसंघ महाराष्ट्राचे केंद्रात जेवढे वजन आहे तेवढे राहणार नाही .स्वतंत्र मराठवाडा तर विकासाच्या ऐवजी भिकेला लागेल.मराठवाडयात उप्तन्नाचे काहीही स्त्रोत नाही अशा अवस्थेत स्वतंत्र मागणी करणे चुकीचे आहे असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.