Breaking News

नागपूर-मुंबई दुरांतोच्या चालकांचा रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांकडून गौरव

मुंबई, दि. 03, सप्टेंबर - नागपूर-मुंबई दुरांतोच्या अपघाताच्या वेळी समयसूचकता दाखवत प्रवाशांचे प्राण वाचवणा-या वीरेंद्र सिंग आणि अभय कुमार या दोन्ही  चालकांचा रेल्वे मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अश्‍विनी लोहानी यांनी गौरव केला. या दोघांना प्रत्येकी 5 हजार रूपयाचे बक्षीसही देण्यात आले. नागपूरहून मुंबईकडे  येत असताना या दोन चालकांनी रेल्वे रूळावरील अडथळा दूरूनच ओळखला आणि वेळीच ब्रेक मारला. त्यामुळे प्रत्यक्ष अडथळ्याजवळ रेल्वे आली, तेव्हा रेल्वेची  गती खूप कमी होती. त्यामुळे इंडिजनासह डबे रूळावरून उतरले असले तरीही जीवितहानी झाली नाही.