Breaking News

शिवसागर जलाशयात विद्युत खांब पडल्याने तीन गावे अंधारात

सातारा, दि. 22, सप्टेंबर - बामनोली-तापोळा पावसाचा जोर वाढल्यामुळे शिवसागर जलाशयाला लागून असणा-या गावांच्या घराजवळ पाणी शिरले होते. तर  काही ठिकाणी विजेचे खांबदेखील पाण्यात बुडाले होते. 
आपटी येथील शिवसागर जलाशयाकाठी असणारा विद्युत खांब पडल्याने बामनोलीचा भाग संपूर्ण अंधारात होता. मात्र, या गावांतील विद्युत पुरवठा नेमका कशामुळे  खंडित झाला आहे, हे महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे दिवसभर तापोळा येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण भाग पिंजून काढला असता  त्यांना सायंकाळच्या सुमारास आपटी शिवसागर जलाशयजवळ खांब पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फुरुस, वाकी, निपानी या गावांचा विद्युत पुरवठा बंद झाला  होता.