Breaking News

कुत्र्यांना फास घालुन न पकडण्याच्या मनेका गांधींच्या महापालिकेला सुचना

औरंगाबाद, दि. 22, सप्टेंबर - औरंगाबाद शहरातील कुत्र्यांना कसे पकडावे याचे मार्गदर्शन केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी महापालिकेला पत्र पाठवून केले आहे. 
मोकाट कुत्र्यांमुळे औरंगाबादकर हैराण झाले आहेत.त्यांच्या मागणीमुळे महापालिका मोकाट कुत्र्यांना फास टाकून पकडते. मात्र ही पध्दत क्रुर असून कुत्र्यांना या मुळे  जखमी होतात , त्यांचा जीव जाण्याची भिती असते,असे पत्रच केंद्रीय मंत्री व प्राण्यांसाठी काम करणा-या मेनका गांधी यांच्याकडून महापालिकेला आले आहे. शेवटी  आता कुत्र्यांना त्रास होऊ न देता कुत्री कशी पकडायची याचे प्रक्षिण पालिका कर्मचा-यांना देण्यात येणार आहे.पुर्वी एका युवकाने कुत्र्याला पकडण्याच्या  औरंगाबादच्या पालिकेच्या पध्दतीचा फोटो प्राणी संघटनेला पाठवला होता.याचीच दखल घेवून मनेका यांनी पत्र पाठविले आहे.