Breaking News

लखनौ-मुंबई विशेष रेल्वेच्या फे-या वाढवल्या

लखनौ, दि. 03, सप्टेंबर - गोरखपूर - मुंबई सुपर फास्ट जन साधारण विशेष साप्ताहिक एक्सप्रेसच्या आठ फेर्‍या वाढविण्यात आल्याची माहिती रेल्वे  प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 
9 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबरपर्यंत दर शनिवारी सकाळी 8.25 वा. गोरखपूर येथून सोडण्यात येणारी गाडी दुस-या दिवशी 12.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज  टर्मिनलला पोहोचेल. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून 10 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत दर रविवारी दुपारी 2.20 वाजता सोडण्यात येणारी गाडी  दुस-या दिवशी संध्याकाळी 6.45 ला गोरखपूरला पोहोचेल. ही गाडी खलीलाबाद, बस्ती, गोंडा, लखनौ, कानपूर सेंट्रल, ऊरई, झांशी, भोपाळ, इटारसी, भुसावळ  आणि कल्याण स्थानकावर थांबणार आहे.