Breaking News

तीन कोटीची लाच घेताना प्राप्तिकर विभागाच्या उपायुक्तांना अटक

मुंबई, दि. 23, सप्टेंबर - प्राप्तिकर विभागाचे उपायुक्त जयपाल स्वामी यांना तीन कोटी रुपयांची लाच घेताना आज केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. या  कारवाईत जयपाल स्वामी यांच्यासह अन्य तिघांनाही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत. यापूर्वी आयकर खात्यातील अपील विभागाचे आयुक्त बी. व्ही.  राजेंद्रप्रसाद यांच्यासह अन्य पाच अधिका-यांना हवालाच्या माध्यमातून लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.