Breaking News

ठाण्यात रिक्षा चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेच्या पथकाकडून 17 रिक्षा जप्त

ठाणे, दि. 23, सप्टेंबर - ठाणे जिल्ह्यातील कोनगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने एका रिक्षाचोर टोळीचा पर्दाफाश करून चोरीला गेलेल्या 17 रिक्षा  जप्त केल्या आहेत. अरमान अजगर अली शेख, अश्पाक शकील शेख आणि असमद सलीम शेख या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अरमान अजगर अली  शेख हा या टोळीचा म्होरक्या आहे. शेख हा आरटीओ एजंट असल्याची थाप मारून चोरीच्या रिक्षांची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  यानंतर पोलिसांनी सापळा रचून या तिघांना अटक केली.
ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेकडो रिक्षा चोरीला जात आहेत. काही दिवसांपूर्वी कोनगावातील कोनतरी परिसरातून रिक्षा चोरीला गेल्याची  तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर चोरीला गेलेली रिक्षा भिवंडी तालुक्यातील महापोली गावातील रिक्षा स्टँडवर आढळली.