Breaking News

गोरक्षकांवरील हल्ला: आरोपींच्या अटकेसाठी मोहिम

अहमदनगर, दि. 08 - श्रीगोंद्यात  गाई पकडून दिल्याच्या रागातून पुण्यातील गोरक्षकांवर श्रीगोंद्यात पो ठाण्यासमोरच  जमावाने भीषण हल्ला चढवला होता यात गोरक्षक जखमी झाले होते याबाबत शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 24 रा. शिवाजीनगर पुणे) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यात आणि राज्याबाहेर उमटण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोहिम हाती घेतली. उशिरा पर्यंत कुणालाही ताब्यात घेण्यात आले नसले तरी घटनेचे गांभीर्य ध्यानात घेऊन  अतिरिक्त पोलीस फाटा मागवण्यात आला आहे.
काष्टीच्या बाजारातून कत्तलीसाठी घेऊन जणार्‍या गायी पकडून दिल्याच्या रागातून अतिक कुरेशी व इतर आरोपींनी  गोरक्षकांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करून जखमी केले. यावेळी अतिक कुरेशी व इतर इसमांनी नितीन देशमुख यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची चैन लंपास केली.असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या हल्ल्यात  नितीन नथू देशमुख, निखिल झरांडे, प्रवीण गायकवाड, उपेंद्र बलकवडे, केतन बासुदकर हे गोरक्षक जखमी झाले आहेत. या प्रकरणाचा  पुढील तपास श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरक्षक बाजीराव पोवार हे करीत आहेत. दरम्यान, कालच्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज दि.7 श्रीगोंद्यात राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या असून श्रीगोंद्यात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
याप्रकरणी अतिक कुरेशी, अण्णा भंगारवाला सय्यद, तय्यब कुरेशी, नदीम कुरेशी, फिरोज कुरेशी, शब्बीर बेपारी, रमजू कुरेशी, मैनुद्दीन कुरेशी, तय्यब कुरेशी, काल्या कुरेशी, मुन्ना बेपारी, मुस्ताफ कुरेशी, नदीम कुरेशी, मुनाफ कुरेशी, बाबू कुरेशी, मोबिन कुरेशी (सर्व रा. श्रोगोंद) व इतर कुरेशी समाजातील 40 ते 45 जणांविरुद्ध आर्म ऍक्ट,दरोडा तसेच सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करून दंगल पसरवणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.