Breaking News

अतिवृष्टीमधील नुकसानग्रस्त पिकांचे कर्ज माफ करावे- माजी आ. घुले

नेवासा, दि. 31, ऑगस्ट - जिल्ह्यात अतिवृष्ठीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून त्या पिकासाठी घेतलेले चालू पिककर्ज माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केली आहे. नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेस शाखेचे उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 
यावेळी ज्ञानेश्‍वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, कार्याध्यक्ष दादा गंडाळ, युवक तालुकाध्यक्ष नवनाथ साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम मिसाळ, प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे, ज्ञानेश्‍वरचे संचालक जनार्दन पटारे, अशोकराव मिसाळ, युवक जिल्हा उपाध्यक्ष सोपान महापूर, शंकरराव भारस्कर आदी उपस्थित होते.
घुले म्हणाले, समाजात भांडणे लावून राजकीय पोळी भाजण्याचे व शेतकयांना वायावर सोडण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. फसवणूक केल्याने या सरकारवर शेतकरी व युवकांची प्रचंड नाराजी आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे त्वरीत करावेत, त्या पिकाचे चालू कर्जमाफी करून शेतकयांना नव्याने कर्ज मिळावे. जायकवाडी पुनर्वसित शेतकऱयांना मिळालेल्या वर्ग दोनच्या जमिनींवरील पोट खराब्याच्या नोंदी रद्द कराव्यात. अन्यथा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी वेळी सरकारी यंत्रणेला दिला.  कर्जमाफी हे उपकार नाहीत. विरोधक व शेतकरी यांची एकजुट झाल्याने कर्जामाफीचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. त्यातही सरकारने भूलभूलैया केल्याचा आरोप करत घुले यांनी शेतकयांच्या खात्यात पैसे व युवकांना नोकरीच्या भूलथापा गेल्या निवडणूकांत या सरकारने दिल्या. प्रत्यक्षात एक रूपयाही शेतकयाच्या खात्यात पडला नाही तर युवकांना नोकरयांचा पत्ताच नाही. शेतकयांचा शेतमाल शहरात स्वस्त दराने कसा विकला जाईल, यासाठी शेतकयांचे वाटोळे करण्याचे काम हे सरकार करत आहे, अशी टीकाही घुले यांनी केली.
माजी आ. पांडुरंग अभंग म्हणाले, नेवासा हा राष्ट्रवादीच्या विचाराचाच तालुका आहे. तालुक्यातील जनता राष्ट्रवादी बरोबरच असून केवळ पुढार्‍यांमध्ये फूट झालेली आहे. फुले, शाहू आंबेडकरांचे पुरोगामी विचारच विकासाकडे घेऊन जाणार विचार आहेत. शरद पवार हे याच पुरोगामी विचाराने वाटचाल करीत असल्याने त्यांच्या विचाराशिवाय राज्य हालत नाही. 61 निकष लावून सरसकट कर्जमाफीची घोषणा ही केवळ लबाडाचे आमंत्रण ठरत आहे. साखरेचे भाव वाढून शेतकर्यांना दोन पैसे अधिक मिळेल, असे वाटत असतांनाच केंद्र सरकारने बाहेरून साखर आयात केली. नेवासा तालुक्यातील शेती कर्जासाठीची चिट्ठी पद्धत बंद करा असा टोलाही अभंग यांनी लगावला जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे म्हणाले, नेवासा तालुक्यातील तरुणांची दिशाभूल करून नेतृत्वावर आरोप करण्याचा उद्योग सुरू आहे.तालुक्यात राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी  चंद्रशेखर घुले पाटील यांनी निट बसविलेली आहे. भाजप सरकारला शेतकर्‍यांचे काही देणे घेणे नाही. केवळ लाटेवर निवडून आलेल्या या सरकारवर शेतकरी नाराज झालेला आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, युवक तालुकाध्यक्ष नवनाथ साळुंके, प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे, नेवासा शहर अध्यक्ष गफूरभाई बागवान, जनार्दन पटारे, काकासाहेब पुंड यांनी ही मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष भिमराज शेंडे यांनी प्रास्तविक केले. माळीचिंचोरा शाखाध्यक्ष कैलास चौधरी, खंडू खंडागळे, प्रवीण गोडसे, अर्जुन चौधरी, शेखर वाघमारे, शिवाजी धानापुणे, बाबासाहेब चिंधे, रवींद्र चिंधे, प्रकाश वाघमारे, विलास मोटे, काकासाहेब पुंड, बाळासाहेब आहिरे, रामभाऊ धानापुणे, इब्राहिम सय्यद आदींसह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन तर रमेश शेंडे यांनी आभार मानले.